जळगाव - जिल्ह्यात उद्या (ता. 6) वैद्यकीय, अभियांत्रिकी व औषध निर्माणशास्त्र या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी महाराष्ट्र शासनातर्फे सामाईक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) होणार आहे. शहरातील 26 केंद्रांवर ही परीक्षा होत असून त्यात एकूण नऊ हजार 198 विद्यार्थी सहभागी असतील. दरम्यान या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनातर्फे सर्व तयारी आज करण्यात आलेली आहे. त्यातच परीक्षेसाठी पर्यवेक्षकांना आज जिल्हा बॅंकेच्या सभागृहात प्रशिक्षण देण्यात आले. आज दुपारनंतर सर्व परीक्षा केंद्रांवर पर्यवेक्षक बैठक क्रमांक टाकताना दिसून येत होते. या परीक्षेतील काही गोंधळ होवू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त सर्वच परीक्षा केंद्रांवर ठेवण्यात येणार असून, त्यादृष्ट्रीनेही तयारी झालेली आहे. विषय, परीक्षेची वेळ अशी भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र - सकाळी 10 ते 11.30 जीवशास्त्र - दुपारी 12 ते 1.30 गणित - दुपारी 3 ते 4.30 बैठक व्यवस्था अशी(सुरवातीला केंद्राचे नाव नंतर परीक्षार्थीचा बैठक क्रमांक) ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय - 1700001 ते 1700480 ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय - 1700481 ते1701008 केसीई सोसायटीचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय - 1701009 ते 1701248 शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय--1701249 ते 1701488 आयएमआर कॅम्पस--1701489 ते 1701944 केसीई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व इनफारमेशन टेॅजी--1701945 ते 1702424 प.न. लुंकड कन्याशाळा--1702425 ते 1702736 ऍड. सीताराम (बबनभाऊ) बाहेती महाविद्यालय--1702737 ते 1703168 मौलाना अब्दुल अँग्लो उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय--1703169 ते 1703648 डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय--1703649 ते 1703960 शेठ लालजी नारायणजी सार्वजनिक विद्यालय--1703961 ते 170344 रावसाहेब रूपचंद विद्यालय--1704345 ते 1704798 श्रम साधना ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (बांभोरी)--1720001 ते 1720600 खुबचंद सागरमल विद्यालय--1720601 ते 1720895 प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल--1730001 ते 1730240 रोझलॅंड इंग्लिश स्कूल--1730241 ते 1730432 पुष्पावती खुशाल गुळवे मुलींचे माध्यमिक विद्यालय--1730433 ते 1730672 भाऊसाहेब राऊत हायस्कूल--1730673 ते 1730912 काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय--1730913 ते 1731272 भगीरथ इंग्लिश मीडियम स्कूल--1731273 ते 1731512 महाराणा प्रताप माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय--1731513 ते 1731992 सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूल--1731993 ते 1732232 बहिणाबाई माध्यमिक विद्यालय--1732233 ते 1732448 नूतन मराठा महाविद्यालय--17322449 ते 1732880 नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय--1732881 ते 1733240 जि.प.विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालय--1733241 ते 1733505. भाषानिहाय पेपर लिहिणारे परीक्षार्थीजिल्ह्यात इंग्रजी माध्यमातून पेपर लिहिणारे विद्यार्थी--9119 उर्दू माध्यमातून पेपर लिहिणारे--72 मराठी माध्यमातून पेपर लिहिणारे विद्यार्थी--7 फक्त आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमासाठी--बी.बी.प्रकारचे केंद्र फक्त अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी--एम.एम.प्रकारचे केंद्र दोन्ही अभ्यासक्रमासाठी बसू इच्छिणाऱ्या विद्याथर्यांसाठी--एम.बी. प्रकारचे केंद्र आहे. डुप्लिकेट प्रवेशपत्र, माध्यम बदलाची सुविधाया परीक्षेसाठी प्रवेशपत्र हरविलेले व गहाळ झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आधी एक तास डुप्लिकेट प्रवेशपत्र मिळू शकणार आहे. शिवाय मराठी व उर्दू माध्यमातून पेपर लिहिण्याचा पर्याय स्वीकारलेल्या विद्यार्थ्यांना लेखी अर्ज दिल्यास इंग्रजीतून परीक्षा देता येईल, अशी माहिती परीक्षेचे संपर्क अधिकारी डॉ. जी. व्ही. ठाकरे यांनी दिली. उमेदवारांनी घ्यावयाची काळजीसर्व उमेदवारांनी संबंधित परीक्षा केंद्रावर सकाळी साडेनऊला उपस्थित राहावे. सहा मे हा दिवस कार्यालयीन कामकाजाचा असल्याने विद्यार्थ्यांनी नियोजित वेळेत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याच्या दृष्टीने प्रवासाचे नियोजन करो. गतवर्षी भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांचा पेपर संपल्यानंतर जीवशास्त्र या विषयाचा पेपर सुरू होणाऱ्या दरम्यान प्राप्त होणार कमी कालावधी लक्षात घेता दोन पेपर मधला कालावधी वाढविण्यात आला आहे. |
Wednesday, May 5, 2010
जिल्ह्यात एमएचटी-सीइचे 9198 विद्यार्थी
वसंतदादा बॅंकेचा घडा भरला
सांगली - येथील वसंतदादा शेतकरी बॅंकेची अखेरची घरघर सुरू झाली आहे. बॅंकेचा प्रशासकीय खर्च कमी करण्यासाठी अवसायक मंडळाने दहा शाखा बंद करून त्यांचे कामकाज जवळच्या शाखेत स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्या ठेवीदारांनी विमा क्लेम अद्याप घेतलेला नाही, त्यांनी 31 पर्यंत घ्यावा, असे आवाहन अवसायक मंडळाचे अध्यक्ष वसंतराव पाटील यांनी केले आहे.
साखर कारखाने, बॅंक आदी विविध संस्थांमुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळाली. त्यात वसंतदादा शेतकरी सहकारी बॅंकेची भूमिका महत्त्वाची होती; मात्र दहा वर्षांतील संचालक मंडळाचा मनमानी कारभार, कमी तारणावर जादा दिलेली कर्जे यांमुळे ही बॅंक अडचणीत आली. दीड वर्षापूर्वी रिझर्व्ह बॅंकेने बॅंकेचा परवाना रद्द केला. बॅंक अवसायनात काढून अवसायक मंडळाची नियुक्त केली. पहिल्या टप्प्यात एक लाखापर्यंतचा विमा क्लेम असलेल्या ठेवीदारांना ठेवीचे वाटप करण्यात आले. काही कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती योजनेतून कमी केले. अनेक कर्मचाऱ्यांना भविष्यनिर्वाह निधीची रक्कम अद्याप मिळालेली नाही.
अवसायक मंडळाने आता दुसऱ्या टप्प्यात प्रशासकीय खर्च कमी करण्यासाठी बॅंकेच्या शाखा कमी करण्यास सुरवात केली आहे. चांदणी चौक व टिंबर एरिया शाखा बॅंकेच्या मार्केट यार्डातील मुख्य शाखेत स्थलांतरित करण्यात येणार आहेत. माधवनगर व बुधगाव शाखेचे साखर कारखाना शाखेत, विश्रामबाग शाखेचे सांगली-मिरज रोड शाखेत, फळ मार्केट शाखेचे गावभाग शाखेत, सांगलीवाडी शाखेचे सराफकट्टा शाखेत, मिरजेतील स्टेशन रोड शाखेचे लक्ष्मी मार्केट शाखेत, गडहिंग्लजचे कोल्हापूर व शिराळा शाखेचे इस्लामपूर शाखेत स्थलांतर होणार आहे. स्थलांतरित शाखांत 1 जूनपासून कामकाज सुरू होणार आहे.
विमा क्लेम योजनेअंतर्गत ठेवीदारांना एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी मंजूर झाल्या आहेत. अनेक ठेवीदारांनी या रकमा काढून घेतल्या आहेत. ज्या ठेवीदारांनी रकमा अद्याप घेतलेल्या नाहीत, त्यांनी 31 मेपर्यंत काढून घाव्यात, असे आवाहन अवसायक मंडळाचे अध्यक्ष वसंत पाटील यांनी केले आहे.
साखर कारखाने, बॅंक आदी विविध संस्थांमुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळाली. त्यात वसंतदादा शेतकरी सहकारी बॅंकेची भूमिका महत्त्वाची होती; मात्र दहा वर्षांतील संचालक मंडळाचा मनमानी कारभार, कमी तारणावर जादा दिलेली कर्जे यांमुळे ही बॅंक अडचणीत आली. दीड वर्षापूर्वी रिझर्व्ह बॅंकेने बॅंकेचा परवाना रद्द केला. बॅंक अवसायनात काढून अवसायक मंडळाची नियुक्त केली. पहिल्या टप्प्यात एक लाखापर्यंतचा विमा क्लेम असलेल्या ठेवीदारांना ठेवीचे वाटप करण्यात आले. काही कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती योजनेतून कमी केले. अनेक कर्मचाऱ्यांना भविष्यनिर्वाह निधीची रक्कम अद्याप मिळालेली नाही.
अवसायक मंडळाने आता दुसऱ्या टप्प्यात प्रशासकीय खर्च कमी करण्यासाठी बॅंकेच्या शाखा कमी करण्यास सुरवात केली आहे. चांदणी चौक व टिंबर एरिया शाखा बॅंकेच्या मार्केट यार्डातील मुख्य शाखेत स्थलांतरित करण्यात येणार आहेत. माधवनगर व बुधगाव शाखेचे साखर कारखाना शाखेत, विश्रामबाग शाखेचे सांगली-मिरज रोड शाखेत, फळ मार्केट शाखेचे गावभाग शाखेत, सांगलीवाडी शाखेचे सराफकट्टा शाखेत, मिरजेतील स्टेशन रोड शाखेचे लक्ष्मी मार्केट शाखेत, गडहिंग्लजचे कोल्हापूर व शिराळा शाखेचे इस्लामपूर शाखेत स्थलांतर होणार आहे. स्थलांतरित शाखांत 1 जूनपासून कामकाज सुरू होणार आहे.
विमा क्लेम योजनेअंतर्गत ठेवीदारांना एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी मंजूर झाल्या आहेत. अनेक ठेवीदारांनी या रकमा काढून घेतल्या आहेत. ज्या ठेवीदारांनी रकमा अद्याप घेतलेल्या नाहीत, त्यांनी 31 मेपर्यंत काढून घाव्यात, असे आवाहन अवसायक मंडळाचे अध्यक्ष वसंत पाटील यांनी केले आहे.
आयपीएल करमाफी याचिकेत पवारांना पक्षकार करण्यास मुभा -
मुंबई - आयपीएल स्पर्धेला करमाफी देण्यासंदर्भातील याचिकेत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना पक्षकार करण्याची मुभा उच्च न्यायालयाने आज अर्जदार शिवसेना नेते सुभाष देसाई यांना दिली.
या प्रकरणाची सुनावणी आज न्या. पी. बी. मजमुदार व न्या. राजेश केतकर यांच्यासमोर झाली. देसाई यांच्या मूळ याचिकेत पवार यांच्यावरही काही अप्रत्यक्ष आरोप करण्यात आले होते. पवार केंद्रीय मंत्री असून ते क्रिकेट नियामक मंडळाशी संबंधित आहेत. ते अध्यक्ष असलेला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा राज्य सरकार व केंद्र सरकारमध्ये सहभागी आहे. राज्य सरकारचे अर्थखातेही याच पक्षाकडे आहे. त्यामुळे या स्पर्धेला करमाफी देण्याचा निर्णयही राजकीय दडपणामुळे घेण्यात आल्याचे अर्जदारांचे म्हणणे आहे. त्यासंदर्भात आज पवार यांना पक्षकार करण्याची मुभा खंडपीठाने दिली.
स्पर्धेवर करमणूक कर आकारायचा किंवा नाही याबाबत सरकारचा अंतिम निर्णय अद्याप झाला नाही, असे राज्य सरकारतर्फे आज सांगण्यात आले. मंत्र्यांसाठी राज्य सरकारची आचारसंहिता आहे. मात्र, मंत्र्यांनी क्रीडासंस्थांवर पदाधिकारी म्हणून जावे किंवा नाही याबाबत आपण माहिती घेऊन सांगू, असेही सरकारी वकिलांनी सांगितले. कोणी मंत्री क्रीडासंस्थांचे पदाधिकारी झाल्यास काम करताना त्यांचे हितसंबंध परस्परविरोधी होतील का, अशी विचारणा खंडपीठाने केली होती. त्यावर सरकारी वकिलांनी हे उत्तर दिले. आता आज खंडपीठाने हाच प्रश्न केंद्रीय मंत्र्यांबाबत विचारला. क्रीडासंस्थेचा पदाधिकारी असलेल्या केंद्रीय मंत्र्याला त्या क्रीडासंस्थेबाबत काही निर्णय घेण्याची वेळ आली तर, त्यांचे हितसंबंध परस्परविरोधी होतील का? असे खंडपीठाने विचारून सुनावणी तहकूब केली
या प्रकरणाची सुनावणी आज न्या. पी. बी. मजमुदार व न्या. राजेश केतकर यांच्यासमोर झाली. देसाई यांच्या मूळ याचिकेत पवार यांच्यावरही काही अप्रत्यक्ष आरोप करण्यात आले होते. पवार केंद्रीय मंत्री असून ते क्रिकेट नियामक मंडळाशी संबंधित आहेत. ते अध्यक्ष असलेला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा राज्य सरकार व केंद्र सरकारमध्ये सहभागी आहे. राज्य सरकारचे अर्थखातेही याच पक्षाकडे आहे. त्यामुळे या स्पर्धेला करमाफी देण्याचा निर्णयही राजकीय दडपणामुळे घेण्यात आल्याचे अर्जदारांचे म्हणणे आहे. त्यासंदर्भात आज पवार यांना पक्षकार करण्याची मुभा खंडपीठाने दिली.
स्पर्धेवर करमणूक कर आकारायचा किंवा नाही याबाबत सरकारचा अंतिम निर्णय अद्याप झाला नाही, असे राज्य सरकारतर्फे आज सांगण्यात आले. मंत्र्यांसाठी राज्य सरकारची आचारसंहिता आहे. मात्र, मंत्र्यांनी क्रीडासंस्थांवर पदाधिकारी म्हणून जावे किंवा नाही याबाबत आपण माहिती घेऊन सांगू, असेही सरकारी वकिलांनी सांगितले. कोणी मंत्री क्रीडासंस्थांचे पदाधिकारी झाल्यास काम करताना त्यांचे हितसंबंध परस्परविरोधी होतील का, अशी विचारणा खंडपीठाने केली होती. त्यावर सरकारी वकिलांनी हे उत्तर दिले. आता आज खंडपीठाने हाच प्रश्न केंद्रीय मंत्र्यांबाबत विचारला. क्रीडासंस्थेचा पदाधिकारी असलेल्या केंद्रीय मंत्र्याला त्या क्रीडासंस्थेबाबत काही निर्णय घेण्याची वेळ आली तर, त्यांचे हितसंबंध परस्परविरोधी होतील का? असे खंडपीठाने विचारून सुनावणी तहकूब केली