Thursday, April 1, 2010

हे डोकं आहे की फ्लॉवर पॉट ?

गुलाबाचं फुल , मोगर्‍याचं फुल
चाफ्याचं फुल , शेवंतीचं फुल
किती किती फुलं खोवली आहेत तिने डोक्यात
कळेना ..
हे डोकं आहे की फ्लॉवर पॉट ? 

स्वत:चा शोध एकट्याला कधीच लागत नाही

स्वत:चा शोध एकट्याला कधीच लागत नाही

स्वत:चा शोध एकट्याला कधीच लागत नाही,
सावलीशिवाय ,
"स्व" ची जाणिव कधीही होत नाही,
सावली नकोस शोधु ,
ती आपल्या जवळच असते,
नजर फक्त मागे वळव,
डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते,

सवयींचे काय , त्या कशाही जडतात,
हळु हळु अंगवळणीही पडतात,
म्हणुन का लक्ष्य सोडायचे असते?
एकटेपणा टाकुन , सावलीसह पुढे जायचे असते.


विश्वासाला तडा गेल्यावर
काही मार्गच ऊरत नाही,
तरीपण विश्वास ठेवावा लागतो
नाहीतर जगन्याची आशाच ऊरत नाही...

 

श्रीरामनवमी

श्रीरामनवमी :



चैत्र शुक्ल नवमी या दिवशी रामजन्माचा उत्सव साजरा करतात. राम हा सत्यवचनी, सदाचारी, प्रेमळ, व पराक्रमी राजा होता. आदर्श मूल्यांची जपणूक म्हणजे ‘राम’ असे सांगत पिढ्यानपिढ्या रामाचा आदर्श ठेवण्यास सांगितले जाते आहे. त्या प्रजाहितदक्ष श्री रामाचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला झाल्याचे मानले जाते. दुपारी १२ वाजता रामाचा जन्म सोहळा साजरा करण्याची पद्धत आहे. रामाच्या मंदिरात त्यासाठी रामचरित्र सांगितले जाते. प्रसाद म्हणून सुंठ-साखर एकत्र करून देण्याची पद्धत आहे.

श्रीरामनवमीचा उत्सव अयोध्येत मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. भारतात हा उत्सव अनेक राज्यात केला जातो. पूर्वापार महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी श्रीरामनवमीच्या निमित्ताने रामचरित्राचे कीर्तन केले जाते. नऊ दिवस हा उत्सव करुन नवमीला सांगता केली जाते. समर्थ रामदास, श्रीगोंदवलेकर महाराज आदी श्रीरामभक्त महाराष्ट्रात होऊन गेले. या दोहोंचा संबंध असणार्‍या ठिकाणी (उदा. सज्जनगड, चाफळ, गोंदवले...इ.) हा उत्सव विशेष उत्साहात साजरा केला जातो.

महाराष्ट्रातील प्रत्येक राममंदिरात श्रीरामनवमी साजरी केली जाते. रामायण या महाकाव्यातील अनेक कथा आजच्या काळातही लाखो लोकांना  खिळवून ठेवतात. आदर्श जीवनाबद्दलच्या या कथा आजही बोध घेण्याजोग्या आहेत.