Saturday, April 3, 2010

गुरुपौर्णिमा

गुरुपौर्णिमा - व्यासपूजा महोत्सव


आषाढी पौर्णिमा या तिथीला, पूर्णचंद्र आकाशात असताना, जगद्गुरू श्री व्यासमहर्षींचे स्मरण करून, आपल्या 
विकासासाठी, श्री परम्रेश्वराच्या कृपाआशीर्वादासाठी प्रार्थना करण्यासाठी, एकत्र जमण्याचा उत्सव.
आषाढातील पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून किंवा व्यासपूजन करून साजरी करतात. गुरुपरंपरेत व्यासांना सर्वश्रेष्ठ गुरू मानले आहे. भारतीयांना गुरु-शिष्य परंपरेचे फार महत्त्व आहे. आई-वडील आणि गुरू ही तीन दैवते मानावीत असे सांगितले जाते. व्यासमहर्षी यांची पूजा म्हणजे गुरुपौर्णिमा. शंकराचार्य यांची पूजा म्हणजे गुरुपूजन. संत ज्ञानेश्र्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास, श्री गोंदवलेकर महाराज, श्री साईबाबा, श्री गजानन महाराज आदी संत-सत्पुरुषांना गुरुस्थानी मानून महाराष्ट्रात ठिकठिकाणी त्यांची पूजा केली जाते. गुरूने दाखवलेल्या मार्गाने जाऊन झालेल्या प्रगतीबद्दल गुरुकडे येऊन सांगणे, आशीर्वाद घेणे, कृतज्ञता व्यक्त करणे,  गुरुपूजन - मुरुवंदन करणे म्हणजेच गुरुपौर्णिमा.



गुरु-शिष्य परंपरा आजही काही क्षेत्रात जपली जाते. संगीत आणि नृत्य या क्षेत्रांत ही परंपरा पिढ्या न पिढ्या जपली जाते आणि अजूनही गुरुवंदनाने तिचे महत्त्व नव्या शिष्यांवर बिंबवले जात आहे. आजच्या काळात शाळा-महाविद्यालयांमध्येही या दिवशी ‘गुरुपूजन’ करून शिक्षक प्राध्यापकांविषयीचा आदर व्यक्त केला जातो.

समर्थ रामदास - कल्याण स्वामी, श्रीकृष्ण - अर्जुन, श्री रामकृष्ण- विवेकानंद अशा पूर्वीच्या गुरुशिष्यांची उदाहरणे डोळ्यासमोर ठेवून गुरुपूजन केले जाते. आजच्या काळातील महाराष्ट्रातील रमाकांत आचरेकर - सचिन तेंडुलकर ही गुरुशिष्यांची जोडीही अनुकरणीय आहे. आपल्या राज्यातील कुस्ती या खेळातही गुरूला मोठे स्थान आहे

No comments:

Post a Comment