Monday, April 5, 2010

नागपंचमी : 
श्रावण महिन्यात शुक्ल पंचमीला येणारा हा सण निसर्गातील प्राण्यांविषयी लोकांना जाणीव करून देणारा आहे. शेतीची नांगरण करण्याचा काळ, आणि त्यामुळे वारुळ-नाग असा त्याचा विचार करून नागांचे रक्षण करण्याचा संदेश देणारा हा सण आहे. कापणे, तळणे, भाजणे, नांगरणे अशी कामे करू नयेत अशी एक प्रथा त्याला जोडली आहे. वारुळांची पूजा व नागांची पूजा करून त्यांना दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवला जातो. मुली, स्त्रिया झाडाला झोका बांधून खेळतात; झिम्मा, फुगडी यांसारखे पारंपरिक खेळही खेळतात. महाराष्ट्रात नागपंचमीला असंख्य तरुण पतंग उडविण्याचाही आनंद लुटतात. पतंग उडवण्याच्या माध्यमातून पुरुष या सणाला जोडले गेले आहेत. सृष्टी हिरवीगार होऊन वातावरण आनंदाचे झालेले असते त्याच वेळी म्हणजे श्रावणात असे बरेच सण-दिवस साजरे केले जातात. हा श्रावणाच्या सुरुवातीला येणारा सण आहे. वारुळापर्यंत जाणे हे आनंदाचे व्हावे, एकत्र येण्याची मजा सगळ्यांना घेता यावी म्हणून फेर धरणे, गाणी म्हणणे, फुगड्या, झिम्मा, झोका असे खेळ खेळणे या गोष्टी नागपंचमीला जोडल्या गेल्या असाव्यात.

सांगली जिल्ह्यात बत्तीसशिराळा नावाच्या गावात अनेक गारुडी नाग पकडून आणतात. नागांनी फणा काढणे, पुंगीने मोहून जाणे असे खेळ दाखवले जातात. ही प्रथा गेली कित्येक वर्षे सुरू आहे.



कहाणी नागपंचमीची


shankar
ऐका नागोबा देवा, तुमची कहाणी, एक नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला पाच सात सुना होता. चातुर्मासात श्रावणमास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. कोणी आपल्या आजोळी, कोणी पंजोळी, कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत. सर्वांत धाकटी सून होती. तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं. तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्वसंबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेराहून न्यायला येईल. असं म्हणू लागली.

शेषभगवानास तिची करुणा आली. त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरिता आला. ब्राह्मण विचारात पडला. हा इतके दिवस कुठं लपून राहिला व आताच कोठून आला. पुढं त्यानं मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं. ब्राह्मणानं तिची रवानगी कली. त्या वेषधारी मामानं वारूळात नेलं. खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बायकामुलांना ता‍कीद दिली की, हिला कोणी चावू नका!

shiv
एके दिवशी नागाची नागीण बाळंत होऊ लागली. तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला. पुढं ती व्याली. तिची पिलं वळवळ करी लागली. ही मुलगी भिऊन गेली. हातातला दिवा खाली पडला. पोरांची शेपटं भाजली. नागीण रागावली. सर्व हकीकत नवर्‍याला सांगितली. तो म्हणाला, तिला लौकरच सासरी पोचवू. पुढं ती पूर्ववत् आनंदानं वागू लागली. ऐके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्यदेह धारण करून, तिला सासरी पावती केली.

shankar
नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईपाशी चौकशी केली, आमची शेपटं कशान तुटली? तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना फार राग आला. हिचा सूड घ्यावा म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चि‍त्रं काढली, त्यांची पूजा केली, जवळ नागाणे, लाह्या, दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागांची पिलं पहात आहेत. सरतेशेवटी तिनं देवाची प्रार्थना केली, जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा, पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत, असं म्हणून नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला. मनात हिच्याविषयी दया आली. पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली, दूध, पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले. दुसर्‍या दिवशी हार उचलून गळ्यात घातला. तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

No comments:

Post a Comment