Friday, April 2, 2010

महाराष्ट्राची अस्मिता तपासून पाहावी

विविध गुणांनी झळाळणार्‍या महाराष्ट्रातील व्यक्तिमत्त्वांनी देशाच्या इतिहासात मानाचे स्थानपटकावले आहे. एकूणच भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय नकाशात महाराष्ट्राचे महत्त्वसातवाहन राजांच्या काळापासून आहे, असे मानले जाते. साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा,परकीय आक्रमणे अशा विविध ठिकाणी महाराष्ट्राने देशाला दिशा दिलेली आहे.
महाराष्ट्रातील ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचा वेध घेतला, तर एक गोष्ट निश्चित म्हणाविशी वाटतेकी, महाराष्ट्र हा बुद्धिवाद्यांचा देश आहे आणि बुद्धिवाद्यांच्या गुणधर्मानुसार अटळ असणारीजागरूकता महाराष्ट्राच्या मातीत आहे. म्हणूनच एकविसाव्या शतकात, इलेक्ट्रॉनिक युगमाणसाला संपूर्णपणे व्यापून टाकीत असताना, या वेगवान बदलात आपलं महाराष्ट्रपण संपणारकाय, अशी रास्त शंका आजच्या बुद्धिवाद्यांना भेडसावते आहे. अशा वेळी आपल्या महाराष्ट्राचीअस्मिता तपासून पाहावी, तसेच स्वत्व घडवणार्‍या शक्तींचे पुनर्लोकन करावे.

No comments:

Post a Comment