Friday, April 2, 2010

श्री हनुमान जयंती



श्री हनुमान जयंती :
चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी श्री हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. रामायण काळातील हनुमानाचा पराक्रम, त्याची रामावरची श्रद्धा, भक्ती, त्याचे ब्रह्मचर्याचे पालन करण्याचे व्रत या सर्व गोष्टींची आठवण ठेवण्यासाठी हा दिवस लोक साजरा करतात.  बलोपासना हा हनुमानाचा विशेष गुण होता.  व्यायाम करून शरीर निरोगी ठेवण्याकडेही लक्ष द्यायला हवे असे समर्थांनी स्वत:च्या उदाहरणातून दाखवून दिले.  स्वत: बलोपासना करून श्री हनुमानाची सार्थ भक्ती करणार्‍या समर्थ रामदासांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी श्री हनुमानाची स्थापना केली. या सर्व ठिकाणी श्री हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. महाराष्ट्रातील जवळजवळ प्रत्येक गावात आपणास श्री हनुमान मंदिर आढळतेच. यांपैकी बहुसंख्य मंदिरांत हा उत्सव यथाशक्ति साजरा केला जातो.

No comments:

Post a Comment