Showing posts with label महाराष्ट्र आणि किल्ले. Show all posts
Showing posts with label महाराष्ट्र आणि किल्ले. Show all posts

Friday, April 2, 2010

अर्नाळा



किल्ल्याचे इतिहासाथिल  महत्त्व :
चारही बाजूने पाणी असणारा अर्नाळा हा जलदुर्ग गुजरातचा सुलतान महमुद बेगडा याने १५१६ मध्ये बांधला. १५३० मध्ये पोर्तुगीजांनी हा किल्ला जिंकून अनेक नवीन बांधकामे केली. १७३७ मध्ये, सुमारे दोनशे वर्षांच्या पोर्तुगीज सत्तेनंतर हा किल्ला मराठयांच्या ताब्यात आला. पहिल्या बाजीरावांनी या किल्ल्याची पुनर्बांधनी केली. १८१७ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

गडावरील ठिकाणे:
अर्नाळा किल्ला चौकोनी असुन सुमारे दहा मीटर उंचीची अखंड व मजबुत तटबंदी या किल्ल्याचे संरक्षण करते. तटबंदीमध्ये असलेले बुरुज आजही ठामपणे उभे आहेत. किल्ल्याला तीन दरवाजे असुन मुख्य दरवाजा उत्तरेला आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजुस दोन बुलंद बुरुज उभे आहेत. या दरवाजाच्या कमानीवर अत्यंत सुंदर नक्षीकाम असुन दोन्ही बाजुला वाघ व हत्ती यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. दरवाजावर दरवाजावर खालील शिलालेख आढळतो:

'बाजीराव अमात्य सुमती आज्ञापले शंकर!
पाश्चात्यासि वधुनि सिंधु उदरी बांधा त्वरे जंजिरा!!'

किल्ल्याच्या आत त्र्यंबकेश्वर व भवानीमातेचे
मंदिर आहे. या शिवाय किल्ल्यात गोड पाण्याच्या विहिरी सुद्धा आहेत.
किल्ल्याच्या सभोवार लोकांची वस्ती असुन त्यांची शेतीही आहे. किल्ल्याच्या
मुख्य दरवाजाच्या बाहेर कालिकामातेचे मंदिर आहे.

अर्नाल्याच्या तटाची उंची १०  मीटर आहे.तटाची रुंदी तीन मीटर आहे.आत दत्तमंदिर आहे.

एका पोर्तुगीजाने लिहिले आहे-'मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून वसई प्रांत
जिंकून घेतल्यावर लगेच वसई व अर्नाळा येथे आपले आरमार उभारले व विजयदुर्ग
ताब्यात घेतल्यापासून तीन ठिकाणी मराठ्यांचे आरमारी तळ झाले आहेत.'

अर्नाळ्याचा हा कोट पूर्ण बेटावर बांधला नसल्याने बेटावर शत्रू उतरून
कोटाकडे येण्याची शक्यता होती.या बेटावर त्यासाठी टेहालनिसाठी आणि क्वचित
तोफांचा मारा करण्यासाठी एकांडा टेहालणी बुरुज बांधलेला आहे.युरोपच्या
किनारपट्टीवर असे प्रचंड बुरुज आढळतात.अशा बांधकामाला तिकडे 'मोर्ट्रेलो
टोवर' म्हणतात.असे एक आगळेवेगळे बांधकाम अर्नाळा बेटावर आहे.ते
अभ्यासण्यासारखेआहे.

गडावर जाण्याच्या वाटा:
पश्चिम रेल्वेच्या विरारपासून अर्नाळा अंदाजे १० कि.मी. असुन तेथे जाण्यास एस. टी. बस व रिक्षा
यांची सोय आहे. समुद्रकिनार्‍यापासून बोटीने किल्ल्यावर जावे लागते. ही
बोट सकाळी ६.०० ते दुपारी १२.३० व संध्याकाळी ४.०० ते ७.०० या वेळेतच
आपल्याला किल्ल्यावर घेउन जाते.

Wednesday, March 31, 2010

महाराष्ट्रातील किल्ले


महाराष्ट्राला भूगोलाबरोबर इतिहासही आहे. त्याच भूगोलात आणि इतिहासात भर घालणारे किल्ले महाराष्ट्राची शान आहेत.



अंकाई
अंजनवेल
अंजनेरी
अंतुर किल्ला
अंबागड
अंमळनेरचा किल्ला
अकोला किल्ला
अचला
अजिंक्यतारा
अर्नाळा
अलंग
अलिबाग - हिराकोट
अवचितगड
अशेरीगड
अहिवंत



आंबोलगड
आजोबागड
आमनेरचा किल्ला
आसवगड



इंद्राई
इरशाळगड



उंदेरी किल्ला



औंढ



कण्हेरगड
कमळगड
कर्नाळा
कल्याणगड
कानिफनाथ गड
काळदुर्ग
कावनई
किल्ले पुरंदर
कुर्डूगड - विश्रामगड
केंजळगड
कोतळीगड
कोरीगड - कोराईगड
कोर्लई
कोहोजगड



खांदेरी किल्ला



गाविलगड
गुणवंतगड
गोंड राजाचा किल्ला
गोरखगड



घनगड



चंदन - वंदन
चंदेरी किल्ला
चांभारगड
चावंड




जंजिरा
ज पुढे.
जीवधन




तळगड
तारामती (किल्ला)
ताहुली
तिकोना
तुंग
तोरणा
त्रिंगलवाडी




थाळनेर किल्ला




दातेगड
दुर्ग - ढाकोबा
दौलताबाद




धोडप




नगरधन
नरनाळा किल्ला
नळदुर्ग
न्हावीगड




पट्टागड
पन्हाळा
परांडा किल्ला
पवनीचा किल्ला
पांडवगड
पारोळयाचा किल्ला
पेठ किल्ला
पेब
प्रचितगड
प्रतापगड
प्रबळगड
प्रबळगड - मुरंजन




बल्लारशा
बहादरपूर किल्ला
बहिरगड
बहिरी - गडदचा बहिरी
बाळापूर किल्ला
बिरवाडी




भामेर किल्ला
भारतातील किल्ले
भूदरगड
भैरवगड




मदनगड
मलंगगड
मल्हारगड
महाराष्ट्रातील किल्ले
महिपतगड
महिमानगड
मांगी - तुंगी
माणिकगड
माहुलीगड
 मुरुड जंजिरा
मुल्हेर
मोरागड




रत्नदुर्ग
रसाळगड
राजगड
राजधेर
राजमाची
रायकोट
रायकोट किल्ला
रायगड (किल्ला)
रायरीचा किल्ला
रायरेश्वर
रोहीडा
रोहीदास (किल्ला)




लळिंग किल्ला
लिंगाणा
लोहगड




वर्धनगड
वसंतगड
वसईचा किल्ला
वारुगड
वासोटा
विजयदुर्ग
विशाळगड
विसापूर
वैराटगड




शिरगावचा किल्ला
शिवनेरी




संतोषगड
सज्जनगड
सप्तशृंगी
सरसगड
सांकशीचा किल्ला
साचा:महाराष्ट्रातील किल्ले
सानगडीचा किल्ला
साल्हेर
सिंधुदुर्ग
सिंहगड
सिताबर्डीचा किल्ला
सिध्दगड
सुधागड
सुमारगड
सोनगिर किल्ला




हडसर
हरगड
हरिश्चंद्रगड
हातगड